HardikPandya Wife

नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यात हार्दिक आणि नताशाला अगस्त्य हा मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा गेल्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये त्यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. हार्दिक-नताशाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नताशाने इन्स्टाग्रामवरुन पांड्या हे नाव काढून टाकलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


तसंच हार्दिकने नताशाच्या वाढदिवशीही कोणतीच पोस्ट केली नाही. नताशा यावेळी आयपीएलमध्येही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यानच, घटस्फोटाच्या प्रकरणात हार्दिकला त्याच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागणार असल्याच्याही अफवा रंगल्या आहेत. पण, अद्याप याबाबत नताशा किंवा हार्दिकने कोणतंही भाष्य केलेलं नाही.